मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तीर्थक्षेत्र

जीवंत मानवी देवांचे तीर्थक्षेत्र… आनंदवन ,हेमलकसा आणि सोमनाथ बंधन टूरच्या आनंद वारी सोबत आम्ही या तीर्थक्षेत्राची सहल करुन आलो. आनंदवन म्हणजे भूतकाळावर मात, लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे वर्तमानकाळाला साथ आणि सोमनाथ प्रकल्प म्हणजे भविष्य काळाला हात! आनंदवन,वरोरा         महारोगाने विद्रूप झालेल्या मानवी देहातील चैतन्य कामाला लावून फुलवलेले नंदनवन! या नंदनवनाचा आद्यमाळी महामानव मानवी देहातील देव बाबा आमटे! समाजाने तिरस्काराने टाकून दिलेले बेवारस मानवी जीव सन्मानाने उभे करण्याचे काम बाबांनी केले. शेती,बागा,हस्तकलाकेंद्र,हातमाग,यंत्रमाग,तांत्रिक कार्यशाळा, शाळा व कॉलेजे एक स्वयंपूर्ण वसाहत जी बाहेरच्या जगाला विविध उत्पादने पुरविते. हाताला बोटे नसलेले लोक निरोगी लोकांना तोंडात बोट घालायला लावणारी काम करीत आहेत!                              ज्यांची बोटे रोगाने हिरावून घेतली आहेत असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे...

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...