मुख्य सामग्रीवर वगळा

अतिरेक्यांचे उगमस्थान ...

अतिरेक्यांच्या उगमापाशी जाऊन त्यांची दिशा बदलायला हवी. कोणताही धर्म अतिरेक्यांना प्रोत्साहन देत नाही असे म्हटले जाते.परंतु अतिरेक्यांच्या ह्रदयाशी धार्मिक भावना असतात हे उघड सत्य आहे. त्यामुळे अतिरेक्यांच्या बंदोवस्तासाठी धार्मिक भावनांचा तळ गाठला पाहिजे.
  धार्मिक भावनांचा उगम धार्मिक मिथक्कथांतून होतो. या मिथकांचे अर्थ लावण्याचे काम त्यात्या धर्माच्या धर्मगुरुंनी केलेले असते. आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ,दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांना नष्ट करणे हे पुण्याचे काम, आपल्या लोकांची संख्या वाढवली व दुसऱ्यांची घटवली तर आपल्याला स्वर्गात उत्तम स्थान मिळते वगैरे कल्पना भाविकांच्या डोक्यात घातल्यावर त्याला अतिरेकाची फळे येतात. शेवटी ह्या अतिरेक्यांच्या कोपाला आपलेच लोक बळी पडायला लागले तरी या धर्मगुरुंना हे कसे झाले याचा उलगडा होत नाही. यासाठी सर्व धर्माच्या धर्मगुरुंचे प्रबोधन होणे जरूर आहे.
       माजी राष्ट्रपती स्व. डॉ. कलाम यांनी सर्व धर्माच्या धर्मगुरुंच्या मुलाखती घेऊन काही सर्वसामान्य तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पद्धतीने समाज शास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक व धर्मगुरुंचा एक अभ्यास गट तयार करुन सर्व धार्मिक कथांचा अर्थ आपल्या देशाच्या संस्कृतीशी व लोकशाहीशी सुसंगत कसा करता येईल हे पहायला हवे. तरच धर्म समाजाची धारणा करणारे होतील!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...

ज्ञानाचे सामर्थ्य

- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates! ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.           मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली  दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्य...