मुख्य सामग्रीवर वगळा

अन्न नासाडी

आपल्या घरांमध्ये आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवले गेल्यास,उरलेले टाकून दिले जाते. लग्न समारंभात किंवा तशाच मोठ्या कार्यक्रमात खूप वाढलेले अन्न न संपल्यामुळे कचराकुंडीत टाकले जाते. अशाप्रकारे फेकून दिलेले अन्न पशु, पक्षी, कुत्री, मांजरे व किडे मुंग्या खातात, तर मग ते वाया जाते असे कसे म्हणता येईल?
            इतर जीवांनी त्या  अन्नावर उपजीविका करणे म्हणजे त्या अन्नाची विल्हेवाट लावणे होय! तो त्या अन्नाचा उपयोग नाही. ते अन्न शिजवून मानवी जीवनासाठी तयार केलेले असते ते फेकून देण्याची वेळ येणे म्हणजेच ते अन्न वाया घालवणे किंवा नासाडी करणे होईल.निसर्गातील पशुपक्षी किडेमुंग्या हे आपल्या फेकून दिलेल्या अन्नावर जगत नसून निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या अन्नाचा उपयोग करून निसर्गाचे चक्र सुरू ठेवण्याचे काम करतात. माणसाच्या खाण्या-पिण्याचा त्या चक्रातील त्यांच्या जगण्याशी संबंध येतो तेवढाच!
           अन्न, पाणी व हवा ही राष्ट्रीय संपत्ती आहे.या संपत्तीचा योग्य वापर न केल्यामुळे आपलेच काही भाऊबंद अन्न पाण्याअभावी प्रदूषित हवे मुळे नीटपणे जगू शकत नाहीत. त्यांचा योग्य प्रमाणे वापर करणे ही जबाबदारी आपण मानणे हा मानवी संस्कृतीचा भाग आहे.
           या प्रश्नाची दुसरी बाजू, आपल्या शहरात वाढणारी भटक्या कुत्र्यांची संख्या आपण फेकून दिलेल्या अन्नामुळे वाढत असते हे आपल्या लक्षात येत नाही. अन्नधान्य व्यवस्थित न ठेवल्यामुळे उंदरांची संख्या वाढते. सांडपाण्याचे व्यवस्थापन न केल्यामुळे डासांची संख्या वाढते. त्यानंतर कुत्री, उंदीर व डास यांच्यावर आणि त्यापासून होणाऱ्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतो. अन्न, पाणी व हवा यांचे योग्य वापर व्यवस्थापन केल्यास असे अनेक प्रश्न सुटू शकतात!
             

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...

ज्ञानाचे सामर्थ्य

- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates! ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.           मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली  दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्य...