दिल्लीमध्ये झालेल्या दंगली पन्नाच्यादरम्यान अनेक लोकांचे प्राण गेले,दोनशेच्यावर लोक जखमी झाले आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली.या दंगलीत सरकारची आणि पोलिसांची भूमिका संदिग्ध होती.या दंगली घडवून आणल्या जातात असे अनेक पत्रकारांचे मत आहे.लोकांना देखील हे हळूहळू कळायला लागले आहे. या दंगलीमध्ये असे दिसून येते की जाळपोळ करणारे लोक बाहेरून आलेले असतात. शेजारी-शेजारी राहणारे लोक एकमेकांना मदत करतात.दुसर्या धर्माच्या धार्मिक स्थळांना देखील संरक्षण देतात.दुसऱ्या धर्माच्या लोकांना आणि मालमत्तेला वाचवण्याचा प्रयत्न करतात. दिल्लीमधल्या आहे का मोहिंदर नावाच्या गृहस्थाने आणि त्याच्या मुलाने अनेक मुस्लिम बांधवांना वाचवले.प्रत्येक धर्माच्या लोकांनी दुसर्या धर्माच्या आपल्या शेजाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बाहेरून येणाऱ्या भाडोत्री दंगलखोर लोकांना रोखण्यासाठी एकत्र राहणाऱ्या लोकांनी स्वयंसेवकांची दले निर्माण करायला हवी.अशा स्वयंसेवी दलामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन ज्या प्रमाणे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी धावतात, त्याप्रमाणे अशा मानवनिर्मित आपत्तीमध्ये देखील मदतीचा हात द्यायला सुरुवात केली तर दंगलखोरांना नक्कीच रोखता येईल.
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा