दिल्लीमध्ये झालेल्या दंगली पन्नाच्यादरम्यान अनेक लोकांचे प्राण गेले,दोनशेच्यावर लोक जखमी झाले आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली.या दंगलीत सरकारची आणि पोलिसांची भूमिका संदिग्ध होती.या दंगली घडवून आणल्या जातात असे अनेक पत्रकारांचे मत आहे.लोकांना देखील हे हळूहळू कळायला लागले आहे. या दंगलीमध्ये असे दिसून येते की जाळपोळ करणारे लोक बाहेरून आलेले असतात. शेजारी-शेजारी राहणारे लोक एकमेकांना मदत करतात.दुसर्या धर्माच्या धार्मिक स्थळांना देखील संरक्षण देतात.दुसऱ्या धर्माच्या लोकांना आणि मालमत्तेला वाचवण्याचा प्रयत्न करतात. दिल्लीमधल्या आहे का मोहिंदर नावाच्या गृहस्थाने आणि त्याच्या मुलाने अनेक मुस्लिम बांधवांना वाचवले.प्रत्येक धर्माच्या लोकांनी दुसर्या धर्माच्या आपल्या शेजाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बाहेरून येणाऱ्या भाडोत्री दंगलखोर लोकांना रोखण्यासाठी एकत्र राहणाऱ्या लोकांनी स्वयंसेवकांची दले निर्माण करायला हवी.अशा स्वयंसेवी दलामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन ज्या प्रमाणे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी धावतात, त्याप्रमाणे अशा मानवनिर्मित आपत्तीमध्ये देखील मदतीचा हात द्यायला सुरुवात केली तर दंगलखोरांना नक्कीच रोखता येईल.
सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात. मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामक...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा