मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भक्त आणि अनुयायी

थोर पुरुषांचे भक्त होणे ही सोपी गोष्ट आहे.  अनुयायी होणे ही कठीण गोष्ट आहे त्यामुळे थोर पुरुषाला भक्त भरपूर असतात परंतु अनुयायी फारच थोडे असतात!      भक्त हे थोर पुरुषाची प्रतिमा किंवा मूर्ती तयार करून  तिची पूजा करतात तर अनुयायी त्यांच्या विचाराप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.       भक्त त्या थोर पुरुषाला देव बनवून त्याच्याकडे स्वत:साठी दया याचना करतात,तर अनुयायी त्या थोर पुरुषाचे विचार समाजासाठी कसे वापरता येतील हे पाहतात.        भक्तांना त्या थोर पुरुषाचा अभिमान वाटतो तर अनुयायांना त्या थोर पुरुषाबद्दल आदर वाटतो.         भक्तांना सर्वांनी आपल्या सारखेच भक्त व्हावे असे वाटते तर अनुयायांना, लोकांनी त्या थोर पुरुषाचे विचार समजून घ्यावेत असे वाटते.        त्या थोर पुरुषावर कुणी टीका केली तर भक्त त्यांच्यावर तुटून पडतात तर अनुयायी त्या थोर पुरुषांच्या विचारातील त्रुटी समजून घेतात.        ...

श्रद्धा व परंपरा

आपल्या रूढी परंपरा आणि श्रद्धा... फ्रान्स मध्ये जाऊन आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रॅफेल विमाना खाली लिंबू ठेवले आणि विमानावर ओमकार लिहिला. आपल्या परंपरा आणि संस्कृती प्रमाणे त्यांनी पूजा-अर्चा केली. भारतीय संस्कृतीत सगळ्या धर्मात असे प्रकार केले जातात. रूढी परंपरा व संस्कृती हा भावनेचा भाग असतो.राज्यकर्त्यांना निवडून येण्यासाठी या भावनेला दुखावून चालत नाही. घटनेमध्ये काहीही लिहिलेले असो.त्याप्रमाणे चालल्यास निवडून येता येत नसेल तर तसे चालणे राज्यकर्त्यांना परवडणार नाही. मग घटनेप्रमाणे चालायचे कोणी याचा विचार केला पाहिजे. लोक राज्यकर्त्यांना अडचणीत टाकतात. देवधर्म, संस्कृती, रूढी परंपरा यांना पाळणारा भावना जपणारा अशा माणसाला ते निवडून देतात आणि त्याच्याकडूनच घटनेप्रमाणे धर्मांधंता, देवभोळेपणा व अंधश्रद्धा याविरुद्ध वागण्याचीही अपेक्षा करतात. राज्यकर्ते हे आपल्या मधूनच येत असल्यामुळे आपल्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने वागण्याची त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे माझ्या गाडीला जर मी लिंबू मिरची बांधत असेन तर माझ्या पुढाऱ्यांकडून मी काय अपेक्षा करणार? देशाचा पुढारी हा जनतेचा...

आपले शिक्षण

आपले शिक्षण... शिक्षण म्हणजे काय? ज्याने माणूस बदलतो, कुटुंब बदलते, समाज बदलतो, देश बदलतो आणि सारे जग बदलते ते शिक्षण! शिक्षण म्हणजे तुमच्या विचारावर आणि आचारावर केलेला संस्कार जो मानवाला तिमिरातून तेजाकडे नेतो, असत्याकडून सत्याकडे आणि मरणातून अमरत्वाकडे नेतो.      स्वातंत्र्यानंतर नेमलेल्या कोठारी आयोगाने म्हटले आहे आपल्या देशाचे भवितव्य शाळेच्या वर्गातील खोल्यातून घडते. कोठारी कमिशनच्या किती योजना प्रत्यक्षात उतरल्या हा संशोधनाचा विषय आहे. शाळेच्या वर्गातील खोल्यातून देशाचे भवितव्य खरेच घडते आहे का?      आपण आपले सगळे शिक्षण लेखी परीक्षा व गुण याच्या दावणीला बांधले आहे. लेखी परीक्षा मुख्यत्वे पाठांतर व स्मरणशक्ती यावर आधारीत आहेत. एकेका गुणासाठी स्पर्धा व त्यासाठी विविध प्रकारच्या भ्रष्ट मार्गाचा आघार! शिक्षण म्हणजे परीक्षा देऊन मिळणारे सर्टिफिकेट व त्या आधारे मिळणारे पुढील प्रवेश! त्यातून पुढे व्यवसायिक शिक्षण, नोकरी-व्यवसाय, लग्न, संसार... संपत्ती व भौतिक सुख या मागे धावणारा एक रोबोट!        आपला विद्यार्थी अनेक विषयाचा अभ्यास करतो प...

अतिरेक्यांचे उगमस्थान ...

अतिरेक्यांच्या उगमापाशी जाऊन त्यांची दिशा बदलायला हवी. कोणताही धर्म अतिरेक्यांना प्रोत्साहन देत नाही असे म्हटले जाते.परंतु अतिरेक्यांच्या ह्रदयाशी धार्मिक भावना असतात हे उघड सत्य आहे. त्यामुळे अतिरेक्यांच्या बंदोवस्तासाठी धार्मिक भावनांचा तळ गाठला पाहिजे.   धार्मिक भावनांचा उगम धार्मिक मिथक्कथांतून होतो. या मिथकांचे अर्थ लावण्याचे काम त्यात्या धर्माच्या धर्मगुरुंनी केलेले असते. आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ,दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांना नष्ट करणे हे पुण्याचे काम, आपल्या लोकांची संख्या वाढवली व दुसऱ्यांची घटवली तर आपल्याला स्वर्गात उत्तम स्थान मिळते वगैरे कल्पना भाविकांच्या डोक्यात घातल्यावर त्याला अतिरेकाची फळे येतात. शेवटी ह्या अतिरेक्यांच्या कोपाला आपलेच लोक बळी पडायला लागले तरी या धर्मगुरुंना हे कसे झाले याचा उलगडा होत नाही. यासाठी सर्व धर्माच्या धर्मगुरुंचे प्रबोधन होणे जरूर आहे.        माजी राष्ट्रपती स्व. डॉ. कलाम यांनी सर्व धर्माच्या धर्मगुरुंच्या मुलाखती घेऊन काही सर्वसामान्य तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पद्धतीने समाज शास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक व धर्...