मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विवेक एक चिंतन...

विवेक एक चिंतन... मित्रांनो,आपण सर्व विवेकाचे विद्यार्थी आहोत. आपण विवेक शिकत आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून योग्य काय ते शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.संपूर्ण मानव जात आज अभूतपूर्व अशा संकटाशी सामना करीत आहे. काही देश पूर्णपणे हतबल झालेले आहेत. आपल्या देशाच्या उंबरठ्यावर हा वनवा येऊन ठेपलेला आहे. अशावेळी विवेकाची खरी गरज आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे ही आपली पहिली गरज आहे.आपणा सर्वांना याची अंतकरणापासून जाणीव आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण विवेकावर चिंतन करणे आवश्यक आहे. विवेकाचा अर्थ काय?    सोक्रेटीस हा एक विवेकी तत्त्वज्ञ.त्यांनी स्वतःविषयी म्हटले, "मला काहीच समजले नाही एवढेच मला समजले आहे" सॉक्रेटीसांचे हे उद्गार म्हणजे विवेकाचा पाया आहे.आज मी असे बोलतो की जणू काही मला सर्व समजले आहे. साक्रेटीसांच्या समकालीन गौतम बुद्ध म्हणतात,"तुम्ही स्वतःचे दीप व्हा. कोणत्याही महापुरुषांवर किंवा महान ग्रंथावर डोळे मिटून विश्वास ठेवू नका.स्वतः विचार करा."  हा विवेकाचा दुसरा विचार. आज मी स्वतः विचार करतो का?माझे सगळे बोलणे दुसऱ्याकडून घेतलेल्या म...

सिक्स थिंकिंग हॅट्स

एडवर्ड डी बोनो या  मनोवैज्ञानिकांने तयार केलेली चर्चा किंवा विचार करण्याची ही पद्धती  सिक्स थिंकिंग हॅट्स   नावाने ओळखली जाते. या पद्धतीमध्ये एकमेकाशी वादविवाद करणे किंवा दुसऱ्यांची मुद्दे खोडणे आणि त्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यावर भर असतो. या पद्धतीने विचारविनिमय केल्यास आपण एकमेकांची मने न दुखावता कमीत कमी वेळात योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतो असा डॉक्टर बोनो यांचा दावा आहे.         या पद्धतीमध्ये सहा वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या विचार करणाऱ्या सगळ्यांनी एका वेळी एक या क्रमाने आपल्या डोक्यावर ठेवायच्या असतात. टोपी प्रत्यक्ष डोक्यावर न ठेवता देखील ती डोक्यावर ठेवली आहे अशी कल्पना करून विचार करता येतो.       पहिली टोपी व्हाईट म्हणजे पांढरीशुभ्र. या टोपी खाली डोके असताना सर्वांनी फक्त दिलेल्या विषयावरील वस्तुस्थिती दर्शक सत्य माहिती मांडायची असते.यासाठी दिलेली माहिती पुराव्यानिशी द्यावी लागते.सर्व सदस्यांना असलेली माहिती एकत्र झाल्यावर टोपी बदलण्यात येते.          दुसरी टोपी लाल भडक. या टोपी खाली डोके असताना ...

मुलांवर संस्कार करतांना...

  सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात.       मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामक...

पाठ्यपुस्तके आणि वाचनालय

          अमेरिकेत आपल्यासारखी इयत्तेप्रमाणे व विषयाप्रमाणे पाठ्यपुस्तके नसतातच त्याऐवजी तेथे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षक विषयाप्रमाणे साहित्य तयार करतात व वाचनालयातील  पुस्तकाची मदत घेतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकाचे वजन नसते. तसेच पालकांसाठी गृह पाठाची दगदग नसते. खाजगी ट्युशन क्लासही नसतात! आणि विशेष म्हणजे बहुतेक सर्व शाळा सरकारीच असतात आणि त्या सर्वात जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत देतात. हे मी अनुभवलेले आहे!                     आपल्या देशात तीन ते चार कोटी विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. त्यांची पाठ्यपुस्तके साधारणपणे प्रत्येक इयत्तेच्या वेगवेगळ्या विषयाची सरासरी पाच धरली तर 20 कोटीच्यावर होतील! एवढी पुस्तके प्रत्येक वर्षी बाद होतात! या पुस्तकांचा खर्च सरकार करते, किंवा पालकांना करावा लागतो, त्याऐवजी तोच खर्च वाचनालयात सुधारणा करण्यासाठी आणि शिक्षक व विद्यार्थी यांचे गुणोत्तर प्रमाणात ठेवण्यासाठी करता आला असता. आपल्या देशातील पाठ्यपुस्तके स्वयं शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय निकृष्...

ज्ञानाचे सामर्थ्य

- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates! ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.           मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली  दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्य...

अन्न नासाडी

आपल्या घरांमध्ये आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवले गेल्यास,उरलेले टाकून दिले जाते. लग्न समारंभात किंवा तशाच मोठ्या कार्यक्रमात खूप वाढलेले अन्न न संपल्यामुळे कचराकुंडीत टाकले जाते. अशाप्रकारे फेकून दिलेले अन्न पशु, पक्षी, कुत्री, मांजरे व किडे मुंग्या खातात, तर मग ते वाया जाते असे कसे म्हणता येईल?             इतर जीवांनी त्या  अन्नावर उपजीविका करणे म्हणजे त्या अन्नाची विल्हेवाट लावणे होय! तो त्या अन्नाचा उपयोग नाही. ते अन्न शिजवून मानवी जीवनासाठी तयार केलेले असते ते फेकून देण्याची वेळ येणे म्हणजेच ते अन्न वाया घालवणे किंवा नासाडी करणे होईल.निसर्गातील पशुपक्षी किडेमुंग्या हे आपल्या फेकून दिलेल्या अन्नावर जगत नसून निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या अन्नाचा उपयोग करून निसर्गाचे चक्र सुरू ठेवण्याचे काम करतात. माणसाच्या खाण्या-पिण्याचा त्या चक्रातील त्यांच्या जगण्याशी संबंध येतो तेवढाच!            अन्न, पाणी व हवा ही राष्ट्रीय संपत्ती आहे.या संपत्तीचा योग्य वापर न केल्यामुळे आपलेच काही भाऊबंद अन्न पाण्याअभाव...

एकटेपणा

मी एकटा आहे ही भावना प्रत्येक माणसात असते.ती घालवण्यासाठीच माणूस दुसऱ्यांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतो.त्यातूनच सण, समारंभ,कार्यक्रम व कर्मकांड निर्माण झाली आहेत. आईच्या गर्भात एका पेशीपासून आपली निर्मिती सुरू होते.आणि आपल्याला जाणीव होते तोपर्यंत आपला एकटेपणा स्पष्ट होत जातो.जन्माला येताना काही वेळा जुळे जन्माला येत असले तरी प्रत्येक जण एकटाच असतो.प्रथम आपल्या सोबतीला असते ती आपली आई.त्यानंतर येतात ते आपले बाबा.त्यानंतर भावंडे,मित्र, मैत्रिणी,बायको,मुले,नातवंडे व शेवटी आपण एकटेच सजीवता सोडून निर्जीवते कडे जातो. आपले माणूस म्हणून अस्तित्व संपते.आपल्या जवळच्या लोकांच्या सहवासात आयुष्यभर असलो तरीही आपला आतला एकटेपणा आपण टाळू शकत नाही.त्यासाठी आपण सोबतीला देवाला घेत असावे.कारण आपण आपल्या कल्पनेने निर्माण केलेल्या देवाला आपल्या आत घेऊ शकतो. म्हणजे देवावरील भक्ती एकटेपणा घालवण्याची एक युक्ती आहे. परंतु ती काल्पनिक गोष्ट आहे हे आपल्याला पूर्णपणे ठाऊक असते.ज्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याने व कल्पकतेने आपण आपल्या मनात देवाची निर्मिती करतो ती आपली प्रतिभा आपल्या सोबत आपल्या जाणिवेच्या काळात सतत...

दिल्लीची दंगल

दिल्लीमध्ये झालेल्या दंगली पन्नाच्यादरम्यान अनेक लोकांचे प्राण गेले,दोनशेच्यावर लोक जखमी झाले आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली.या दंगलीत सरकारची आणि पोलिसांची भूमिका संदिग्ध होती.या दंगली घडवून आणल्या जातात असे अनेक पत्रकारांचे मत आहे.लोकांना देखील हे हळूहळू कळायला लागले आहे. या दंगलीमध्ये असे दिसून येते की जाळपोळ करणारे लोक बाहेरून आलेले असतात. शेजारी-शेजारी राहणारे लोक एकमेकांना मदत करतात.दुसर्‍या धर्माच्या धार्मिक स्थळांना देखील संरक्षण देतात.दुसऱ्या धर्माच्या  लोकांना आणि मालमत्तेला वाचवण्याचा प्रयत्न करतात. दिल्लीमधल्या आहे का मोहिंदर नावाच्या गृहस्थाने आणि त्याच्या मुलाने अनेक मुस्लिम बांधवांना वाचवले.प्रत्येक धर्माच्या लोकांनी दुसर्‍या धर्माच्या आपल्या शेजाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बाहेरून येणाऱ्या भाडोत्री दंगलखोर लोकांना रोखण्यासाठी एकत्र राहणाऱ्या लोकांनी स्वयंसेवकांची दले निर्माण करायला हवी.अशा स्वयंसेवी दलामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन ज्या प्रमाणे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी धावतात, त्याप्रमाणे अशा मानवनिर्मित आपत्तीमध्ये देखील मदतीचा हात द्यायला स...

आरोग्य : कोरोना व्हायरस

न्यू सायंटिस्ट इंटरनॅशनल एडिशन....२८-२-२०२०  करोनाव्हायरस  कोविड -१९.हा वायरस जागतिक आहे. *इटली आणि मध्यपूर्वेमध्ये विषाणूचा प्रसार झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रादुर्भावांना मर्यादा घालण्याची आमची संधी आता संपू शकेल, असा अहवाल देबोरा मॅकेन्झीने दिला आहे.* इटली देशातील कोरोनाव्हायरस उद्रेका दरम्यान मिलान, इटलीमधील सैनिक (झुमा प्रेस / शटरस्टॉक मार्गे क्लाउडिओ फर्मॅन / लॅप्रेस्सी)  कोविड -१९ वायरस विषाणूचा जागतिक संसर्ग पसरला आहे. इटली आणि मध्यपूर्वेमध्ये हा प्रादुर्भाव दिसून आला आहे आणि दक्षिण कोरियामध्ये बरीच वाढ झाली आहे.  वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल टेड्रॉस  गेब्रेयसियस यांनी असा इशारा दिला आहे की *“हा विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला असलेल्या संधीची खिडकी अरुंद होत आहे”.*  खरं तर, कदाचित ती आधीच बंद झालेली असेल.  २१ फेब्रुवारी रोजी, साथीच्या रोगशास्त्रज्ञांनी सांगितले की, जागतिक पातळीवर प्रवास करणाऱ्या संक्रमित लोकांपैकी दोन तृतीयांश लोक शोधण्यात आपण अपयशी ठरत आहोत, “संभाव्यत: चीनच्या मुख्य भूमीच्या  बाहेर अद्याप शोधून काढलेल्य...